Skip to main content

भोजनक्रम

*भोजन कसे घ्यावे*




आपल्या जेवणाचे प्रमाण ठरवण्यसाठी साधे सोपे गणित सांगितले आहे. आपल्या जठराचे ४ भाग करा. त्यातील २/३ भाग घन/ठोस आहार (भात, भाजी, चपाती इ.) घ्या. १/४ भाग द्रवाहार घ्या (दूध, ताक, रस, सूप इ.). उरलेल्या १/४ भाग रिकामा ठेवा. यामुळे जठरात त्याचे चलनवलन नीट होऊन त्याचे पचन नीट होते. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात, 'सावकाश = स+अवकाश' जेवावे.



भोजनक्रम

आहार जेव्हा आपल्या शरीराच्या तापमानाचा होईल तेव्हाच त्याचे आपल्या पाचकाग्निद्वारे पचन होते. योग्य पचनासाठी भोजनक्रम असा असावा:
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
१) प्रथम घोटभर पाणी प्यावे.

२) यानंतर मधुर व स्निग्ध पदार्थ खावेत. यामुळे अन्ननलिकेला स्निग्धत्व प्राप्त होते व पुढील घास ठोठरे न बसता सुलभपणे पुढे जातात. भूक लागलेली असताना पोटात वायुदोष वाढलेला असतो. या वायूची शांती अशा पदार्थांनी होते. यामुळे पुढे होणारे पचनाचे विकार टाळता येतात. तूप लावलेली पोळी किंवा भाकरी असे जड पदार्थ सर्वप्रथम खावेत कारण भुकेलेला माणूस असे पचायला जड पदार्थ सहज पचवू शकतो. यानंतर भात व हलके पदार्थ घ्यावेत. वरण, भात, तूप व वर लिंबू पिळून खाणे ही अत्यंत योग्य पध्दत आहे. प्रथिने (डाळीचे वरण), कर्बोदके (तांदळाचा भात), स्निग्ध (तूप) व विटॅमिन्स या सर्वांचे हे अगदी योग्य मिश्रण आहे.

३) यानंतर खारट व आंबट पदार्थ घ्यावेत. हे पदार्थ जठरात पाचक स्त्राव स्त्रवायला मदत करतात. यात लोणची, पापड, कोथिंबीर या सर्वांचा समावेश होतो पण ही अत्यंत मर्यादित प्रमाणातच घ्यावीत.

४) सर्वात शेवटी तिखट, कडू, व तुरट रस असावेत. भाजी, कढी, ताक हे पदार्थ सर्वात शेवटी घ्यावेत. आवळयासारख्या तुरट रसाच्या आणि कारलं, मेथीसारख्या कडू रसाच्या पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात जरूर करावा.

आपल्याकडे हल्ली स्वीट डिश म्हणून मिष्टान्ने शेवटी खाण्याची पध्दत रूढ होत आहे. हे पदार्थ स्वभावत: पचनाला जड असतात. आधी खाल्लेल्या पदार्थांच्या पचनात पित्त व्यग्र असताना अशा पदार्थांचे व्यवस्थित पचन होत नाही.

अति थंड, अति गरम, अति कोरडे, अति शिजवलेले, शिळे अन्न कधीही खाऊ नये. अति थंड पदार्थ हे जरी स्पर्शाला थंड असले तरी प्रत्यक्षात ते अति पित्तकर असतात कारण त्यांना आपल्या शरीराच्या तापमानाला आणण्याकरीता जठरात अधिक पित्ताचा स्त्राव होतो. अति उष्ण पदार्थांचे तोंड येणे व यांसारखे अनेक दुष्परिणाम तर आपणास माहितच आहे.

आहाराचा प्रमाणे पाणी पिण्याचाही क्रम आहे. काही लाकांना जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यायची सवय असते तर काहींना जेवणानंतर. पेटलेल्या विस्तवावर पाणी ओतलं की विस्तव जसा विझून जातो त्याप्रमाणे जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास पाचकाग्नी विझून जातो. म्हणजेच सर्व पाचक स्त्राव पातळ होतात. याने अग्निमान्द्य होऊन हळूहळू पचनाच्या तक्रारी उद्भवू लागतात. भूक न लागणे ही यातील प्रमुख तक्रार असते. हळूहळू माणूस कृश होत जातो.

जेवल्यानंतर पाणी पिणेही तितकेच वाईट. या सवयीमुळे पुढे स्थौल्य, मधुमेह, तसेच आमाचे विकार उद्भवू लागतात. या पाण्याने पाचक स्त्रावाद्वारे अन्न पचविण्याच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे जेवताना एक ते दीड ग्लास पाणी मध्ये-मध्ये घोट घोट घेत रहावे.

विरुध्दाहार

ज्या दोन वस्तू वेगवेगळया खाण्याने अपाय होत नाही परंतु, त्याच वस्तू एकत्र करून, मिसळून खाल्ल्या तर त्या शरीराला विषाप्रमाणे अपायकारक होतात. अशा वस्तू एकत्र करणे म्हणजे विरुध्दाहार होय.
दूध व आंबट फळे (कैरी, चिंच, करवंद, अननस, मोसंबी, द्राक्ष) एकत्र करुन खाणे.
वरी, मटकी, कुळीथ, उडीद, वाटाणे, वाल दुधाबरोबर खाणे.
कच्चा मुळा व दूध एकमेकांअगोदर खाऊ नयेत, त्याने चामडीचे विकार होण्याची शक्यता असते.
दूध, भात, मीठ एकत्र खाणे. दूध व मासे एकत्र खाणे.
दही कधीही तापवून खाऊ नये.
ताक किंवा दह्याबरोबर केळ खाणे.
गरमागरम जेवणानंतर आईस्क्रीम किंवा शितपेये घेणे.
तूप व मध सम प्रमाणात एकत्र खाणे.
मोहरीच्या तेलात परतलेले मासे, हळकुंड.
मध, दही, मद्य यापैकी कशाबरोबरही उष्ण पदार्थ खाणे.
ताक व कारल्याची भाजी एकत्र खाणे.
रात्री झोपतांना सातूचे पीठ खाणे.
उन्हात तापलेल्या शरीराने थंड दूध किंवा पाणी प्यायल्याने रक्तपित्त होते.
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...